Sunday 3 May 2015

पानगळ...

भिरकावून द्यावीत
वादळाने हवेवर
किंवा तुटून पडावीत
अलगद फांदीवरून पाने
कधी जून झाली म्हणून,
कधी आयुष्य संपले म्हणून
अलगद गळून पडतात
पाने कुणाच्या नकळत
दिसतो मग फक्त पाचोळा,
क्वचित हिरव्यागार आठवणी


कळत नाही कसे
अगदी तशीच
निसटून-तुटून-सुटून
जातात माणसे आयुष्यातून?
एक नवे वादळ उठवून
किंवा तुम्हालाच जून ठरवून!

वाट पाहावी लागते दीर्घ,
पुन्हा पालवी फुटण्याची

हल्ली शिशिर फारच लांबलाय?
की वसंत यायचाच थांबलाय?
----------------------
`पानगळीतला` आम आदमी
(बावीस/एप्रिल/पंधरा)

2 comments:

  1. माणसाच्या जीवनाशी समर्पक.....!!!! चा

    ReplyDelete
  2. मानवी मनाच्या आरशातील प्रतिबिंब

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...