Friday 15 May 2015

आयपीएलमधील मुंबई-कोलकाता लढत रंगतदार अवस्थेत होती. कोलकात्याला अजून 28 धावा हव्या असताना सूर्यकुमारने एक सणसणीत चौकार लगावला. त्या वेळी धावते समालोचन करणारा एक हिंदी वीर म्हणाला, `मी सांगतो, आता हा सामना मुंबईच्या हातून गेला आहे. कोलकाता जिंकणारच जिंकणार.` नवज्योतसिंग सिद्धूने त्याची लगेच री ओढली.

त्यानंतर दोन चेंडू पडले आणि नव्या षटकातील पहिल्याच चेंडूला सूर्यकुमारच्या बॅटीने चालविलेल्या यादवीचा अस्त झाला. पुढे पियूष चावलाच्या कृपेने (सात चेंडू नि एक धाव) मुंबईकर पाच धावांनी जिंकले आणि त्यांचे आव्हानही जिवंत राहिले.

समालोचक, अर्थात कॉमेंटेटर होण्यासाठीचा मूलभूत निकष काय आहे?

शंभर टक्के खोटं दोनशे टक्के आत्मविश्वासानं बोलणं, हाच?!

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...