शुक्रवार, १५ मे, २०१५

आयपीएलमधील मुंबई-कोलकाता लढत रंगतदार अवस्थेत होती. कोलकात्याला अजून 28 धावा हव्या असताना सूर्यकुमारने एक सणसणीत चौकार लगावला. त्या वेळी धावते समालोचन करणारा एक हिंदी वीर म्हणाला, `मी सांगतो, आता हा सामना मुंबईच्या हातून गेला आहे. कोलकाता जिंकणारच जिंकणार.` नवज्योतसिंग सिद्धूने त्याची लगेच री ओढली.

त्यानंतर दोन चेंडू पडले आणि नव्या षटकातील पहिल्याच चेंडूला सूर्यकुमारच्या बॅटीने चालविलेल्या यादवीचा अस्त झाला. पुढे पियूष चावलाच्या कृपेने (सात चेंडू नि एक धाव) मुंबईकर पाच धावांनी जिंकले आणि त्यांचे आव्हानही जिवंत राहिले.

समालोचक, अर्थात कॉमेंटेटर होण्यासाठीचा मूलभूत निकष काय आहे?

शंभर टक्के खोटं दोनशे टक्के आत्मविश्वासानं बोलणं, हाच?!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आजोबा सांगतात, ‘ॲक्ट पॉझिटिव्ह’

  डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू ...