रविवार, ३ मे, २०१५

पानगळ...

भिरकावून द्यावीत
वादळाने हवेवर
किंवा तुटून पडावीत
अलगद फांदीवरून पाने
कधी जून झाली म्हणून,
कधी आयुष्य संपले म्हणून
अलगद गळून पडतात
पाने कुणाच्या नकळत
दिसतो मग फक्त पाचोळा,
क्वचित हिरव्यागार आठवणी


कळत नाही कसे
अगदी तशीच
निसटून-तुटून-सुटून
जातात माणसे आयुष्यातून?
एक नवे वादळ उठवून
किंवा तुम्हालाच जून ठरवून!

वाट पाहावी लागते दीर्घ,
पुन्हा पालवी फुटण्याची

हल्ली शिशिर फारच लांबलाय?
की वसंत यायचाच थांबलाय?
----------------------
`पानगळीतला` आम आदमी
(बावीस/एप्रिल/पंधरा)

२ टिप्पण्या:

रो-को विजय

रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं! ............ मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेवि...